राज्य सेवा पूर्वपरीक्षा झाली. पेपर काहींना ठीक गेला असेल, काहींना अवघड, तर काहींना ब-यापकी चांगला. पेपर संपला तरी सहसा तो उमेदवारांची पाठ सोडत नाही. येथून पुढचे काही दिवस उत्तरतालिकेची वाट पाहण्यात, बरोबर किंवा चूक उत्तरांची संख्या शोधण्यात उमेदवारांचा वेळ जाईल. असे होणे स्वाभाविक असते. पूर्वपरीक्षेनंतरचा हा `शून्य काळ' अंदाज बांधण्यात खर्ची पडतो. तज्ज्ञ असे सुचवतात की, पूर्वपरीक्षेसाठी झोकून अभ्यास केला असेल तर पुढच्या तयारीला सज्ज होण्यापूर्वी दोन दिवसांचा आराम या शून्य काळात जरूर करावा. उत्तरे चूक की बरोबर हे शोधण्यात वेळ घालवू नका, असे कितीदा लिहिले-वाचले आणि ते पटले तरीही आपण स्वत:ला त्यापासून रोखू शकत नाही. निकालाची चिंता आणि उत्सुकता असणे स्वाभाविक आहे; पण एकदा पेपर संपला की, आपल्या हाती फक्त पुढच्या अभ्यासाचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष अभ्यास करणे एवढेच असते. पूर्वपरीक्षा आपण नक्की उत्तीर्ण होऊ असा काहींचा अंदाज असेल. काहींना आपण अपयशी ठरू असं वाटत असेल तर काही द्विधा मन-स्थितीत, संभ्रमात असतील; पण या सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकच समान योजना असेल. सर्वानी आपण मुख्य परीक्षा देणार आहोत असे गृहीत धरून पुढील अभ्यासाचे नियोजन करून अभ्यास सुरू करायला हवा.
यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल? अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडयांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते,ती खरी अभ्यासाची तयारी.
यंदाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा - रविवार, 5 एप्रिल 2015 रोजी राज्यातील 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. राज्यसेवा परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेण्यात येते. यापकी पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असून पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी संधी मिळते.
आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेची तयारी करताना उजळणीला फार महत्त्व आहे. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास करा. सर्वसाधारणपणे 50 मिनिटांच्या अभ्यासानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्या. पुढचा घटक अभ्यासण्याआधी मागच्या घटकातील किती गोष्टी लक्षात राहिल्या याचे मनन करा. दिवसाअखेरीस आपण किती वाचले आणि त्यापैकी आपल्या किती लक्षात राहिले हे तपासून पाहा. प्रत्येक आठवडयाच्या शेवटी आणि प्रत्येक महिन्याअखेरीस आपण अभ्यासलेल्या प्रत्येक घटकाची उजळणी करा. परीक्षा जवळ आली असल्याने रोज किमान 50 ते 100 बहुपर्यायी शब्द सोडवण्याचा सराव करा. या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याची पद्धत उपयुक्त आहे.
सिंधू संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीची वैशिष्टये, महत्त्वाची शहरे, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाज, धार्मिक धारणा, लिपी, मृतदेह पुरण्याच्या पद्धती, महत्त्वाचे अवशेष व त्यांचा अर्थ आणि या संस्कृतीचा र्हास यांचा अंतर्भाव होतो. सिंधू संस्कृती व आर्याचे आगमन यांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. सिंधू संस्कृतीचे लोक व आर्य यांच्यामध्ये कोणता असा संबंध होता की सिंधू संस्कृतीच्या संपूर्ण र्हासानंतर आर्य आले हा मतभेदाचा मुख्य मुद्दा ठरतो.
स्पर्धा परीक्षांची सवय नसल्यामुळे गेल्या वर्षीची परीक्षा अवघड गेल्याचा अनेकांचा अनुभव असेल. त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याची सवय हवी. अनेक वेळा उत्तर माहीत असते पण ते नेमक्या वेळी आठवत नाही, असाही अनेकांचा अनुभव असेल. प्रश्न पाहणे, पर्याय पाहणे आणि त्यातून नेमके उत्तर सुचणे ही मेंदूची प्रतिक्षिप्त क्रिया असली पाहिजे. त्यासाठी वेळेचे नियोजन करून प्रश्न सोडवण्याचा सराव आवश्यक आहे.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
नवीन नोकरीत न चुकणारी एक गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. रंजनच्या मते, त्याला एखाद्याच्या समोर बसून उत्तरे कशी द्यायची हेच जमत नाही आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का? योग्य शब्द वापरले आहेत का? आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाजच येत नाही. अर्थात, रंजन असा एकटाच नाही. त्याच्यासारखे प्रश्न असलेले आणि दोलायमान मनस्थिती असलेले अनेक असतात. तसं पाहायला गेलं, तर बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये ठराविक प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे माहीत असूनही उत्तरांची तयारी केली जात नाही.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खालील यशाच्या 8 पाय-या
विद्याथ्र्यांना करिअरसाठी कशा प्रभावशाली ठरू शकतात ते पाहा. 1) शुभस्य शीघ्रम कोणत्याही आव्हानाला सामोरे जायचे असेल तर तुमची सुरुवात चांगली, सशक्त असली पाहिजे. या काळात इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे. शिकत असताना बातम्या पाहणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडामोडी, या घटनांचे होणारे परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, `शॉर्टकट' किंवा `फास्ट फॉरवर्ड' अभ्यास करून मिळवता येत नाही. मग त्यावर उपाय काय? शाळा, कॉलेजात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे. |
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|